सोमवार, ०९ जून, २०१४

अंकुर महिला बचत गटाला आत्मा यंत्रणेकडून अर्थसहाय्य, 15 दिवसांचे प्रशिक्षण व प्रत्येक सदस्याला 750 विद्यावेतन देण्यात आले. तसेच अंडीपुंज, सिकेटर, ताडपत्री, टोपल्या इत्यादी साहित्यासाठी संलग्न विभागाकडून आर्थिक मदत करण्यात आली. वन विभागाने जंगलामध्ये कोष तयार करण्याची परवानगी दिली. कोष तयार झाल्यानंतर त्याची विक्री न करता त्यापासून धागा काढण्याची तयारी दाखविल्यामुळे 25 महिलांना जमनी येथे फेब्रुवारी महिन्यात 15 दिवसाचे प्रशिक्षण दिले. यावेळीही त्यांना 200 रुपये विद्यावेतन देण्यात आले.
या प्रशिक्षणानंतर रेशीम विभागाकडून 90 टक्के अनुदानावर 7 रिलींग मशिन देण्यात आल्या. यामध्ये 10 हजार 250 रुपये आत्मा यंत्रणेद्वारे उपलब्ध झाले. 10 हजार 500 रुपयांची गुंतवणूक बचत गटांनी केली आणि आता एप्रिल पासून येथे रेशीम धागा काढणे सुरु झाले. गावातील ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीमध्ये हे रिलींग सेंटर सुरु आहे. अंकुर कोष उत्पादक महिला कोषापासून धागा काढून विक्री करणार आहेत तर दुसऱ्या 15 महिलांना धाग्यापासून कापड विणण्याचे प्रशिक्षण आत्मा मार्फत नागपूर येथे विभागीय रेशीम कार्यालयात आयोजित केले आहे. रेशीम विभागाकडून पॉवरलूम 90 टक्के अनुदानावर देण्याचे नियोजन आहे. या वर्षी 12 गावांची निवड करुन त्यांना कोष उत्पादन करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील वर्षी अंडीपुंज तयार करण्यापासून ते कापड तयार करण्याचे उद्दिष्ट त्या महिला बचत गटांनी निश्चित केले आहे. बचत गटाच्या महिला ह्या मेहनती व धाडसी असून स्वत: झाडावर चढून अळ्यांचे स्थलांतरण करतात याचे कौतूक नागपूरचे मुख्य वन संरक्षक शेषराव पाटील यांनी केले. तसेच हेद्राबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार संस्था (मॅनेज) चे उपसंचालक डॉ.लक्ष्मी मुर्थी यांनी महिलांचा काम करण्याचा उत्साह पाहून समाधान व्यक्त केले.
या महिला गटाच्या यशस्वी वाटचालीसाठी उपवनसंरक्षक विनय ठाकरे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा भगत (गोळघाटे), माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी ज्योती निंभोरकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी डॉ.एस.के.शर्मा यांचे विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभले आहे. महिलांसाठी हा अतिशय चांगला उपक्रम असून महिलांचा व्यवसायातील आत्मविश्वास वाढेल अशी प्रतिक्रिया अंकुर टसर कोष उत्पादक गटाच्या अध्यक्षा भारती विजय झंझाड यांनी व्यक्त केली.
-अशोक खडसे, जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा

पापड, लोणचे या सारख्या खाद्यपदार्थांनी घरगुती व्यवसाय म्हणून सुरु केलेल्या महिला बचत गटाची चळवळ आता राज्यभर विविध उद्योग-व्यवसायांच्या माध्यमातून विस्तारली आहे. नवनवीन कल्पना साकारत महिला बचत गट खऱ्या अर्थाने सक्षमीकरणाकडे वाटचाल करीत आहे. याचेच एक उदाहरण म्हणून सीतापार येथील अंकुर महिला बचत गटाकडे पाहता येईल.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याच्या सीतापार येथील अंकुर महिला बचत गटाने टसर कोष पासून वस्त्रनिर्मिती कडे झेप घेतली आहे. खरं म्हणजे महिला बचत गट हे महिलांच्या व्यावहारिक व आर्थिक सक्षमीकरणाचं माध्यम ठरु लागले आहेत.
टसर रेशीम ही भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचे वनक्षेत्र 41 टक्के असून येथे विपूल वन संपदा आहे. सुमारे 372 गावालगत वनक्षेत्र असल्यामुळे वनापासून लाख उत्पादन, टसर रेशीम उत्पादन, मोहफुले, बिडीपत्ता यासह डिंक, चारोळ्या, टेंभराची फळे असा विविध प्रकारचा रान मेवा येथे उपलब्ध आहे. या वनसंपत्तीद्वारे गरीब गरजूंना रोजगार देखील मिळू शकतो.
जिल्ह्यात तयार होणारे कोष मोठे व्यापारी विकत घेतात व त्यापासून कापड करुन नफा मिळवितात हे वास्तव आहे. कोष उत्पादन करणाऱ्या गावकऱ्यांनीच स्वत: कापड तयार करण्याचा प्रयत्न केला तर टसर रेशीम उद्योग शाश्वत होऊ शकतो. ही संकल्पना तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी मांडली. या संदर्भात त्यांनी रेशीम अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, आत्माचे प्रकल्प संचालक यांच्याशी ग्रामस्तरावर चर्चा घडवून या उद्योगाला येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी हीच संकल्पना महिला बचत गटांमार्फत मूर्त स्वरुपात आणण्यासाठी पुढाकार घेतला.
सितेपार (झं) गावातील महिला गटामार्फत कोष उत्पादन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावातील चार गटातील महिलांची बैठक घेतली. त्यानंतर रेशीम विभागाकडून या महिला बचत गटाला व्यवसायासंबंधीचे प्रशिक्षण व अंडी पुंज देऊन 4 एकर वनक्षेत्रावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ऑक्टोबर महिन्यात अंड्यामधून अळी बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु असतांना या बचतगटाच्या महिलांना टसर रेशीम अळ्यांचे संगोपन विविध अवस्था पार पडणे, विविध आजार व कीटकांपासून संरक्षण आदी विषयांबाबत प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. 6 नोव्हेंबर 2013 रोजी दवडीपार रेशीम विभागाच्या या केंद्र ठिकाणी अभ्यास दौरा करण्यात आला. तेथे अंडीपुंज तयार करणे, चॉकी गार्डन तयार करणे, कोषापासून धागा तयार करणे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याच्या सीतापार येथील अंकुर महिला बचत गटाने टसर कोष पासून वस्त्रनिर्मिती कडे झेप घेतली आहे. खरं म्हणजे महिला बचत गट हे महिलांच्या व्यावहारिक व आर्थिक सक्षमीकरणाचं माध्यम ठरु लागले आहेत.
टसर रेशीम ही भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचे वनक्षेत्र 41 टक्के असून येथे विपूल वन संपदा आहे. सुमारे 372 गावालगत वनक्षेत्र असल्यामुळे वनापासून लाख उत्पादन, टसर रेशीम उत्पादन, मोहफुले, बिडीपत्ता यासह डिंक, चारोळ्या, टेंभराची फळे असा विविध प्रकारचा रान मेवा येथे उपलब्ध आहे. या वनसंपत्तीद्वारे गरीब गरजूंना रोजगार देखील मिळू शकतो.
जिल्ह्यात तयार होणारे कोष मोठे व्यापारी विकत घेतात व त्यापासून कापड करुन नफा मिळवितात हे वास्तव आहे. कोष उत्पादन करणाऱ्या गावकऱ्यांनीच स्वत: कापड तयार करण्याचा प्रयत्न केला तर टसर रेशीम उद्योग शाश्वत होऊ शकतो. ही संकल्पना तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांनी मांडली. या संदर्भात त्यांनी रेशीम अधिकारी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक, आत्माचे प्रकल्प संचालक यांच्याशी ग्रामस्तरावर चर्चा घडवून या उद्योगाला येणाऱ्या अडचणी सोडविण्याचे निर्देश दिले. त्यानंतर विद्यमान जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी हीच संकल्पना महिला बचत गटांमार्फत मूर्त स्वरुपात आणण्यासाठी पुढाकार घेतला.
सितेपार (झं) गावातील महिला गटामार्फत कोष उत्पादन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह गावातील चार गटातील महिलांची बैठक घेतली. त्यानंतर रेशीम विभागाकडून या महिला बचत गटाला व्यवसायासंबंधीचे प्रशिक्षण व अंडी पुंज देऊन 4 एकर वनक्षेत्रावर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. ऑक्टोबर महिन्यात अंड्यामधून अळी बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरु असतांना या बचतगटाच्या महिलांना टसर रेशीम अळ्यांचे संगोपन विविध अवस्था पार पडणे, विविध आजार व कीटकांपासून संरक्षण आदी विषयांबाबत प्रशिक्षणात माहिती देण्यात आली. 6 नोव्हेंबर 2013 रोजी दवडीपार रेशीम विभागाच्या या केंद्र ठिकाणी अभ्यास दौरा करण्यात आला. तेथे अंडीपुंज तयार करणे, चॉकी गार्डन तयार करणे, कोषापासून धागा तयार करणे याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
आत्मा यंत्रणेकडून अर्थसहाय्य
अंकुर महिला बचत गटाला आत्मा यंत्रणेकडून अर्थसहाय्य, 15 दिवसांचे प्रशिक्षण व प्रत्येक सदस्याला 750 विद्यावेतन देण्यात आले. तसेच अंडीपुंज, सिकेटर, ताडपत्री, टोपल्या इत्यादी साहित्यासाठी संलग्न विभागाकडून आर्थिक मदत करण्यात आली. वन विभागाने जंगलामध्ये कोष तयार करण्याची परवानगी दिली. कोष तयार झाल्यानंतर त्याची विक्री न करता त्यापासून धागा काढण्याची तयारी दाखविल्यामुळे 25 महिलांना जमनी येथे फेब्रुवारी महिन्यात 15 दिवसाचे प्रशिक्षण दिले. यावेळीही त्यांना 200 रुपये विद्यावेतन देण्यात आले.
या प्रशिक्षणानंतर रेशीम विभागाकडून 90 टक्के अनुदानावर 7 रिलींग मशिन देण्यात आल्या. यामध्ये 10 हजार 250 रुपये आत्मा यंत्रणेद्वारे उपलब्ध झाले. 10 हजार 500 रुपयांची गुंतवणूक बचत गटांनी केली आणि आता एप्रिल पासून येथे रेशीम धागा काढणे सुरु झाले. गावातील ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीमध्ये हे रिलींग सेंटर सुरु आहे. अंकुर कोष उत्पादक महिला कोषापासून धागा काढून विक्री करणार आहेत तर दुसऱ्या 15 महिलांना धाग्यापासून कापड विणण्याचे प्रशिक्षण आत्मा मार्फत नागपूर येथे विभागीय रेशीम कार्यालयात आयोजित केले आहे. रेशीम विभागाकडून पॉवरलूम 90 टक्के अनुदानावर देण्याचे नियोजन आहे. या वर्षी 12 गावांची निवड करुन त्यांना कोष उत्पादन करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पुढील वर्षी अंडीपुंज तयार करण्यापासून ते कापड तयार करण्याचे उद्दिष्ट त्या महिला बचत गटांनी निश्चित केले आहे. बचत गटाच्या महिला ह्या मेहनती व धाडसी असून स्वत: झाडावर चढून अळ्यांचे स्थलांतरण करतात याचे कौतूक नागपूरचे मुख्य वन संरक्षक शेषराव पाटील यांनी केले. तसेच हेद्राबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार संस्था (मॅनेज) चे उपसंचालक डॉ.लक्ष्मी मुर्थी यांनी महिलांचा काम करण्याचा उत्साह पाहून समाधान व्यक्त केले.
या महिला गटाच्या यशस्वी वाटचालीसाठी उपवनसंरक्षक विनय ठाकरे, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा भगत (गोळघाटे), माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी ज्योती निंभोरकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी डॉ.एस.के.शर्मा यांचे विशेष मार्गदर्शन आणि प्रशिक्षण लाभले आहे. महिलांसाठी हा अतिशय चांगला उपक्रम असून महिलांचा व्यवसायातील आत्मविश्वास वाढेल अशी प्रतिक्रिया अंकुर टसर कोष उत्पादक गटाच्या अध्यक्षा भारती विजय झंझाड यांनी व्यक्त केली.
-अशोक खडसे, जिल्हा माहिती कार्यालय, भंडारा
No comments:
Post a Comment