मंगळवार, १० जून, २०१४

महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाकांक्षी सुवर्ण जयंती राजस्व अभियान जळगाव जिल्ह्यातही राबविण्यात आले. या अभियानाची अंमलबजावणी काटेकोरपणे व कसोशीने करण्यात आली. विविध प्रकारचे दाखले मिळविणे हे आता प्रशासनाच्या लोकाभिमुखतेमुळे अगदी सहज झाले आहे. या अभियानाची सुरुवात जळगाव जिल्ह्यात सन 2011-12 मध्ये करण्यात आली.
महसूल विभागाकडून रहिवास, उत्पन्न, जात प्रमाणपत्र अशा विविध प्रकारचे दाखले वितरीत केले जातात. या दाखल्यांची गरज सामान्यत: शेक्षणिक कामांसाठी असते. ही गरज लक्षात घेऊन प्रशासनाने त्या त्या गावात किंवा शक्यतो शाळेतच दाखल्यांची उपलब्धता करण्याचे नियोजन केले. त्यासाठी जळगाव जिल्ह्यात तालुकास्तरावर गटविकास अधिकारी तसेच शाळांचे मुख्याध्यापक यांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये इ.8 वी ते 12 वी पर्यंतच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली. त्यापैकी दाखल्यांची गरज असणा-या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करुन 710 केंद्र शिबीर घेण्याचे नियोजन करण्यात आले. यापेकी 548 शिबीरे घेऊन 1 लाख 40 हजार 71 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या दाखल्यांमध्ये 25 हजार 525 जातीचे, 21 हजार 752 उत्पन्नाचे, 43 हजार 238 अधिवासाचे, 21 हजार 336 रहिवासाचे, 6 हजार 344 उन्नत गटात न मोडणा-या इतर मागासवर्गीयांचे व अन्य 22 हजार 776 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. अशापद्धतीने या अभियानाचा प्रारंभ जळगाव जिल्ह्यात झाला.
दाखले वितरण शिबीरांचे महत्त्व सा-यांच्याच लक्षात आले. त्यामुळे दुस-या वर्षी या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळे मार्च 2013 अखेर जळगाव जिल्ह्याने या अभियानात चांगलीच आघाडी घेतली. आतापर्यंत या अभियानाअंतर्गत केवळ दाखले वाटपाकरीता 725 केंद्रातून एक लाख 4 हजार 634 जातीचे दाखले, दोन लाख 11 हजार 416 उत्पन्नाचे दाखले, 93 हजार 111 अधिवास तर 48 हजार 608 रहिवास दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच एक लाख 8 हजार 35 जणांना नान क्रिमीलेयर दाखल्यांचे तर इतर 44 हजार 173 असे एकूण सहा लाख 9 हजार 977 दाखल्यांचे वाटप करण्यात आले . या दाखले वाटप कार्यक्रमामुळे विद्यार्थी व पालक वर्गात अत्यंत समाधानाचे वातावरण आहे.
शासन थेट जनतेपर्यंत पोहोचते कसे हे प्रत्यक्षात अनुभवता आले. त्याची फलश्रृती सांगायची तर यामुळे विद्यार्थांचा वेळ वाचला, महसूल कार्यालयातील गर्दी कमी झाली. इतर कामकाजाला पुरेसा वेळ मिळू लागला. आणि मध्यस्थ व दलालांमार्फत कोणाचीही अडवणूक न होता सर्व कामे पारदर्शक होऊ लागली आहेत.
-जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.

महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाकांक्षी सुवर्ण जयंती राजस्व अभियान जळगाव जिल्ह्यातही राबविण्यात आले. या अभियानाची अंमलबजावणी काटेकोरपणे व कसोशीने करण्यात आली. विविध प्रकारचे दाखले मिळविणे हे आता प्रशासनाच्या लोकाभिमुखतेमुळे अगदी सहज झाले आहे. या अभियानाची सुरुवात जळगाव जिल्ह्यात सन 2011-12 मध्ये करण्यात आली.
महसूल विभागाकडून रहिवास, उत्पन्न, जात प्रमाणपत्र अशा विविध प्रकारचे दाखले वितरीत केले जातात. या दाखल्यांची गरज सामान्यत: शेक्षणिक कामांसाठी असते. ही गरज लक्षात घेऊन प्रशासनाने त्या त्या गावात किंवा शक्यतो शाळेतच दाखल्यांची उपलब्धता करण्याचे नियोजन केले. त्यासाठी जळगाव जिल्ह्यात तालुकास्तरावर गटविकास अधिकारी तसेच शाळांचे मुख्याध्यापक यांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकांमध्ये इ.8 वी ते 12 वी पर्यंतच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात आली. त्यापैकी दाखल्यांची गरज असणा-या विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करुन 710 केंद्र शिबीर घेण्याचे नियोजन करण्यात आले. यापेकी 548 शिबीरे घेऊन 1 लाख 40 हजार 71 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. या दाखल्यांमध्ये 25 हजार 525 जातीचे, 21 हजार 752 उत्पन्नाचे, 43 हजार 238 अधिवासाचे, 21 हजार 336 रहिवासाचे, 6 हजार 344 उन्नत गटात न मोडणा-या इतर मागासवर्गीयांचे व अन्य 22 हजार 776 दाखल्यांचे वितरण करण्यात आले. अशापद्धतीने या अभियानाचा प्रारंभ जळगाव जिल्ह्यात झाला.
दाखले वितरण शिबीरांचे महत्त्व सा-यांच्याच लक्षात आले. त्यामुळे दुस-या वर्षी या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादामुळे मार्च 2013 अखेर जळगाव जिल्ह्याने या अभियानात चांगलीच आघाडी घेतली. आतापर्यंत या अभियानाअंतर्गत केवळ दाखले वाटपाकरीता 725 केंद्रातून एक लाख 4 हजार 634 जातीचे दाखले, दोन लाख 11 हजार 416 उत्पन्नाचे दाखले, 93 हजार 111 अधिवास तर 48 हजार 608 रहिवास दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच एक लाख 8 हजार 35 जणांना नान क्रिमीलेयर दाखल्यांचे तर इतर 44 हजार 173 असे एकूण सहा लाख 9 हजार 977 दाखल्यांचे वाटप करण्यात आले . या दाखले वाटप कार्यक्रमामुळे विद्यार्थी व पालक वर्गात अत्यंत समाधानाचे वातावरण आहे.
शासन थेट जनतेपर्यंत पोहोचते कसे हे प्रत्यक्षात अनुभवता आले. त्याची फलश्रृती सांगायची तर यामुळे विद्यार्थांचा वेळ वाचला, महसूल कार्यालयातील गर्दी कमी झाली. इतर कामकाजाला पुरेसा वेळ मिळू लागला. आणि मध्यस्थ व दलालांमार्फत कोणाचीही अडवणूक न होता सर्व कामे पारदर्शक होऊ लागली आहेत.
-जिल्हा माहिती कार्यालय, जळगाव.
No comments:
Post a Comment