शुक्रवार, ०६ जून, २०१४

बचत गटाच्या माध्यमातून प्रोत्साहन
गावातील इतर महिलांनाही सोबत घेऊन श्रीमती सविता येळणे यांनी जयभोले शेतकरी स्वयंसहायता बचतगटाची स्थापना केली. या गटामार्फत विविध उद्योगासोबतच दालमीलही सुरु केली आहे. ग्राहकांना नैसर्गिक शेतीमधून दाळ उपलब्ध करुन देतानाच या दालमीलमधून गहू स्वच्छ करून दिला जातो. गावातील महिलांना गावातच या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होत आहे.
वर्धेवरुन नागपूरकडे जाताना पवनार नंतर कान्हापूर हे छोटेसे गाव आहे. महामार्गावर विक्रीसाठी ठेवलेल्या नैसर्गिक शेतीतील पिवळ्या पपई सहज लक्ष वेधून घेतात आणि ग्राहकही सहजपणे पपईची खरेदी करतात. शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पपईचा प्रवास हा प्रत्येकालाच आनंद देऊन जातो.
-अनिल गडेकर

वर्धा : शेतीला जीद्द आणि परीश्रमाची जोड मिळाली तर शेती वरदान ठरु शकते. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून दिलेला हा संदेश सेलू तालुक्यातील कान्हापूरच्या श्रीमती सविता जीवनराव येळणे यांनी प्रत्यक्ष कृतीत उतरविला आहे. नागपूर महामार्गावर अडीच एकराच्या शेतीमधील पपईच्या विक्रीतून त्या दररोज एक हजार रुपये मिळवीत आहेत. मागील वर्षी त्यांनी चार लक्ष रुपयाचे पपईचे उत्पादन घेतले होते.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून कान्हापूरच्या श्रीमती सविता जीवनराव येळणे यांनी नैसर्गिक शेती करण्याला सुरुवात केली. एक एकर शेतात 600 तैवान जातीच्या पपईच्या झाडाची लागवड केली. ग्राहकांना वीषमुक्त कृषी उत्पादन उपलब्ध करुन देण्याच्या कल्पकतेतून श्रीमती येळणे दररोज 800 ते 1000 रुपयाच्या पपईची विक्री करतात. महामार्गावर असलेल्या छोट्याशा टिनशेडमध्ये पिवळ्या रंगाच्या आणि तजेलदार पपई ग्राहकांचे आकर्षण ठरतात आणि ग्राहक सहजपणे गाडी थांबवून 20 रुपये किलोप्रमाणे पपईची खरेदी करतात. हा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच स्फुर्ती देणारा आहे.
कान्हापूरच्या अत्यंत सामान्य घरातील गृहिणी असलेल्या श्रीमती सविता येळणे यांनी तीन वर्षापासून कापूस, सोयाबीन आदी पारंपरिक पीक न घेता ग्राहकांपर्यंत थेट सहजपणे पोहचता येईल अशा फळांच्या व भाज्यांच्या उत्पादनाला सुरुवात केली. अडीच एकरामध्ये मागील वर्षी त्यांनी 4 लक्ष रुपयांचे पपईचे उत्पादन घेतले. यावर्षीही एक एकरामध्ये 600 पपईचे झाडे लावलीत. मध्यंतरी गारपीट व अतिवृष्टीमुळे पपईच्या बागेवर विपरीत परिणाम झाला परंतू त्यांनी अत्यंत मेहनतीने सर्व झाडे जगविली. त्यामुळे दररोज एक हजार रुपयाचे उत्पादन शक्य झाले. या हंगामात 1 लक्ष 50 हजार रुपयाचे उत्पादन होईल असा विश्वास सविता येळणे यांनी व्यक्त केला.
पपईसोबतच मिरची, वांगी, काकडी, भेंडी, चवळी आदी नैसर्गिक शेतीसुद्धा त्या करीत असून, यामधून एक ते दिड लक्ष रुपयाचे उत्पादन होईल असा विश्वासही त्यांना आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून कान्हापूरच्या श्रीमती सविता जीवनराव येळणे यांनी नैसर्गिक शेती करण्याला सुरुवात केली. एक एकर शेतात 600 तैवान जातीच्या पपईच्या झाडाची लागवड केली. ग्राहकांना वीषमुक्त कृषी उत्पादन उपलब्ध करुन देण्याच्या कल्पकतेतून श्रीमती येळणे दररोज 800 ते 1000 रुपयाच्या पपईची विक्री करतात. महामार्गावर असलेल्या छोट्याशा टिनशेडमध्ये पिवळ्या रंगाच्या आणि तजेलदार पपई ग्राहकांचे आकर्षण ठरतात आणि ग्राहक सहजपणे गाडी थांबवून 20 रुपये किलोप्रमाणे पपईची खरेदी करतात. हा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी निश्चितच स्फुर्ती देणारा आहे.
कान्हापूरच्या अत्यंत सामान्य घरातील गृहिणी असलेल्या श्रीमती सविता येळणे यांनी तीन वर्षापासून कापूस, सोयाबीन आदी पारंपरिक पीक न घेता ग्राहकांपर्यंत थेट सहजपणे पोहचता येईल अशा फळांच्या व भाज्यांच्या उत्पादनाला सुरुवात केली. अडीच एकरामध्ये मागील वर्षी त्यांनी 4 लक्ष रुपयांचे पपईचे उत्पादन घेतले. यावर्षीही एक एकरामध्ये 600 पपईचे झाडे लावलीत. मध्यंतरी गारपीट व अतिवृष्टीमुळे पपईच्या बागेवर विपरीत परिणाम झाला परंतू त्यांनी अत्यंत मेहनतीने सर्व झाडे जगविली. त्यामुळे दररोज एक हजार रुपयाचे उत्पादन शक्य झाले. या हंगामात 1 लक्ष 50 हजार रुपयाचे उत्पादन होईल असा विश्वास सविता येळणे यांनी व्यक्त केला.
पपईसोबतच मिरची, वांगी, काकडी, भेंडी, चवळी आदी नैसर्गिक शेतीसुद्धा त्या करीत असून, यामधून एक ते दिड लक्ष रुपयाचे उत्पादन होईल असा विश्वासही त्यांना आहे.
बचत गटाच्या माध्यमातून प्रोत्साहन
गावातील इतर महिलांनाही सोबत घेऊन श्रीमती सविता येळणे यांनी जयभोले शेतकरी स्वयंसहायता बचतगटाची स्थापना केली. या गटामार्फत विविध उद्योगासोबतच दालमीलही सुरु केली आहे. ग्राहकांना नैसर्गिक शेतीमधून दाळ उपलब्ध करुन देतानाच या दालमीलमधून गहू स्वच्छ करून दिला जातो. गावातील महिलांना गावातच या माध्यमातून रोजगारही उपलब्ध होत आहे.
वर्धेवरुन नागपूरकडे जाताना पवनार नंतर कान्हापूर हे छोटेसे गाव आहे. महामार्गावर विक्रीसाठी ठेवलेल्या नैसर्गिक शेतीतील पिवळ्या पपई सहज लक्ष वेधून घेतात आणि ग्राहकही सहजपणे पपईची खरेदी करतात. शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पपईचा प्रवास हा प्रत्येकालाच आनंद देऊन जातो.
-अनिल गडेकर
No comments:
Post a Comment