शुक्रवार, १३ जून, २०१४

जगभरातील विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आर्थिक स्त्रोत म्हणून पर्यटन क्षेत्राला विशेष महत्व आहे. पर्यटनाशी संलग्न व्यवसाय व उदयोगामधून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होते.सिंधुदुर्ग जिल्हयात पर्यावरण व पर्यटन या दोन्ही गोष्टींची सांगड घालून शाश्वत रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून 30 एप्रिल 1997 रोजी घोषित झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्हयाला लाभलेले निसर्गसौंदर्य लक्षात घेता पर्यटकांना सिंधुदुर्गचे वाढते आकर्षण असून जिल्हयाची ओळख काही दिवसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल असा सी वर्ल्ड प्रकल्प जिल्हयात होत आहे. या प्रकल्पाचे भुसंपादनाचे काम सुरू आहे. सागरी जीवनाची प्रत्यक्षात अनुभूती घेण्याची सुवर्ण संधी देशी व विदेशातील पर्यटकांना घेता येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयाचे पर्यटन वाढावे यादृष्टीने परिपुर्ण पर्यटन आराखडा बनविण्याचे काम खाजगी सल्लागारांमार्फत सुरू आहे.हे कामही अंतिम टप्यात आहे.या पर्यटन आराखडयामुळेच जिल्हयातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांना पर्यटकांना भेट देता येणे शक्य होणार आहे. तसेच जिल्हयातील पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. तसेच परदेशी पर्यटकांना डेक्कन ओडीसीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पर्यटन सफरीचा आनंद लुटता येतो.
सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधतेने नटलेला जिल्हा आहे. पर्यटन उदयोगाबरोबरच सर्वच आघाडयावर जिल्हा आपला नावलौकीक प्राप्त करत आहे. गावातील मानसिक, आर्थिक आणि मनुष्यबळ गुंतवणुक वाढवून गावातील पायाभूत सुविधांचा विकास केला तर गाव ओस पडायची थांबतील. कोणताही विकास हा शिक्षण आरोग्य आणि दरडोई उत्पन्न यावरच आधारित असतो.गावात आरोग्य असेल तर मनुष्य कार्यरत राहू शकेल. तो शिकला तर त्याला विकासाच्या संधी शोधता येतील. त्याचा लाभ तो घेऊ शकेल आणि जर शिकुन या संधीचा त्याला लाभ मिळाला तर त्याच उत्पन्नही वाढलेल असेल. विकासाची ही सगळी सुत्र एकमेकांत गुंफलेली आहेत.
पर्यावरणाला हानी पोहोचू नये यासाठी जिल्हयात साकार होत असलेला सागरी जैवविविधता प्रकल्प हा जिल्हयात आहे.जिल्हयाला लाभलेली जैवविविधता टिकवली पाहिजे यासाठी सागरी किना-यावरील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या ठिकाणी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) यांच्या संयुक्त विदयमाने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे.या प्रकल्पामुळे सागरी संपत्तीचे जतन संवर्धन करणे शक्य होणार आहे. शिवाय मत्स्यव्यवसाय, पर्यटन उद्योग याची सांगड घातली जाणार आहे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचे सागरी पर्यटन केंद्र होण्यास मदत होणार आहे. पर्यटन, फलोत्पादन व मत्स्यव्यवसाय ही त्रिसुत्री जिल्हयाच्या विकासात महत्वाची भुमिका निभावणार असून स्थानिकांचा सहभाग, स्थानिक साधन सामग्रीवर भर देणारे पर्यावरण पुरक उदयोग जिल्हयाच्या विकासात मैलाचे दगड ठरणार आहेत.
ई ऑफीस प्रणाली राबविल्यामुळे जिल्हयाचे नाव ई ऑफीस म्हणूनही समोर आलेले आहे. ग्रामीण कुटूंबांना हक्काचा रोजगार देणारी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सिंधुदुर्ग जिल्हयात प्रभावीपणे राबविली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वांगाने परिपुर्ण जिल्हा आहे. शिक्षण क्षेत्रातही हा गौरव मिळविण्याचे काम जिल्हयाच्या शिक्षण विभागाने केलेले आहे. पर्यटन, फलोत्पादन व मत्स्यव्यवसाय ही त्रिसुत्री जिल्हयाच्या विकासात महत्वाची असून त्याअनुषंगाने प्रशासन प्रयत्न करत आहे.
जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग

जगभरातील विकसित राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आर्थिक स्त्रोत म्हणून पर्यटन क्षेत्राला विशेष महत्व आहे. पर्यटनाशी संलग्न व्यवसाय व उदयोगामधून मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होते.सिंधुदुर्ग जिल्हयात पर्यावरण व पर्यटन या दोन्ही गोष्टींची सांगड घालून शाश्वत रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून 30 एप्रिल 1997 रोजी घोषित झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्हयाला लाभलेले निसर्गसौंदर्य लक्षात घेता पर्यटकांना सिंधुदुर्गचे वाढते आकर्षण असून जिल्हयाची ओळख काही दिवसांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल असा सी वर्ल्ड प्रकल्प जिल्हयात होत आहे. या प्रकल्पाचे भुसंपादनाचे काम सुरू आहे. सागरी जीवनाची प्रत्यक्षात अनुभूती घेण्याची सुवर्ण संधी देशी व विदेशातील पर्यटकांना घेता येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयाचे पर्यटन वाढावे यादृष्टीने परिपुर्ण पर्यटन आराखडा बनविण्याचे काम खाजगी सल्लागारांमार्फत सुरू आहे.हे कामही अंतिम टप्यात आहे.या पर्यटन आराखडयामुळेच जिल्हयातील दुर्लक्षित पर्यटन स्थळांना पर्यटकांना भेट देता येणे शक्य होणार आहे. तसेच जिल्हयातील पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे. तसेच परदेशी पर्यटकांना डेक्कन ओडीसीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयाच्या पर्यटन सफरीचा आनंद लुटता येतो.
सिंधुदुर्ग जिल्हा हा जैवविविधतेने नटलेला जिल्हा आहे. पर्यटन उदयोगाबरोबरच सर्वच आघाडयावर जिल्हा आपला नावलौकीक प्राप्त करत आहे. गावातील मानसिक, आर्थिक आणि मनुष्यबळ गुंतवणुक वाढवून गावातील पायाभूत सुविधांचा विकास केला तर गाव ओस पडायची थांबतील. कोणताही विकास हा शिक्षण आरोग्य आणि दरडोई उत्पन्न यावरच आधारित असतो.गावात आरोग्य असेल तर मनुष्य कार्यरत राहू शकेल. तो शिकला तर त्याला विकासाच्या संधी शोधता येतील. त्याचा लाभ तो घेऊ शकेल आणि जर शिकुन या संधीचा त्याला लाभ मिळाला तर त्याच उत्पन्नही वाढलेल असेल. विकासाची ही सगळी सुत्र एकमेकांत गुंफलेली आहेत.
पर्यावरणाला हानी पोहोचू नये यासाठी जिल्हयात साकार होत असलेला सागरी जैवविविधता प्रकल्प हा जिल्हयात आहे.जिल्हयाला लाभलेली जैवविविधता टिकवली पाहिजे यासाठी सागरी किना-यावरील देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या ठिकाणी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (युएनडीपी) यांच्या संयुक्त विदयमाने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे.या प्रकल्पामुळे सागरी संपत्तीचे जतन संवर्धन करणे शक्य होणार आहे. शिवाय मत्स्यव्यवसाय, पर्यटन उद्योग याची सांगड घातली जाणार आहे या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग आंतरराष्ट्रीय दर्जाचे सागरी पर्यटन केंद्र होण्यास मदत होणार आहे. पर्यटन, फलोत्पादन व मत्स्यव्यवसाय ही त्रिसुत्री जिल्हयाच्या विकासात महत्वाची भुमिका निभावणार असून स्थानिकांचा सहभाग, स्थानिक साधन सामग्रीवर भर देणारे पर्यावरण पुरक उदयोग जिल्हयाच्या विकासात मैलाचे दगड ठरणार आहेत.
ई ऑफीस प्रणाली राबविल्यामुळे जिल्हयाचे नाव ई ऑफीस म्हणूनही समोर आलेले आहे. ग्रामीण कुटूंबांना हक्काचा रोजगार देणारी महात्मा गांधी रोजगार हमी योजना सिंधुदुर्ग जिल्हयात प्रभावीपणे राबविली जात आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा सर्वांगाने परिपुर्ण जिल्हा आहे. शिक्षण क्षेत्रातही हा गौरव मिळविण्याचे काम जिल्हयाच्या शिक्षण विभागाने केलेले आहे. पर्यटन, फलोत्पादन व मत्स्यव्यवसाय ही त्रिसुत्री जिल्हयाच्या विकासात महत्वाची असून त्याअनुषंगाने प्रशासन प्रयत्न करत आहे.
जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग
No comments:
Post a Comment