गुरुवार, ३१ जुलै, २०१४

चित्रफीत पाहण्यासाठी खाली पहा...
'अळवावरचं पाणी' ही क्षणभंगूरता आणि अशाश्वतता यासाठी वापरली जाणारी उपमा. पण हीच अळूची पाने शाश्वत रोजगार देऊन क्षणभंगूर मानल्या गेलेल्या जीवनात स्थैर्य, समृद्धी आणू शकतात, हे दाखवून दिलंय, धरणगाव तालुक्यातील अनोरे येथील शेतकऱ्यांच्या गटाने. सामूहिक शेती गटाच्या माध्यमातून अनोरे गावच्या शेतकऱ्यांनी ही किमया साधली आहे.
अळूचे पान. एरवी या भाजीचे व्यावसायिक उत्पादन होऊ शकते, हे सहसा कोणाच्या ध्यानात येत नाही. परसात खोचलेले एक दोन कंद गरजेपूरती अळूची पाने उपलब्ध करुन देत असतात. पण लग्न समारंभात या अळूच्या पानांची वडी, अळवाची भाजी असा मेन्यू असतोच. मात्र नेमके याच वेळी ही पाने बाजारातही उपलब्ध नसतात. ही गरज हेरुन या शेतकऱ्यांनी अळूची लागवड व्यावसायिक स्तरावर केली. या सोबतच गवती चहा, पुदिना अशीही लागवड केली. प्रारंभी खाजगी आणि एकेकट्याने शेतकरी हे पीक घेत होते. नंतर मात्र त्यांनी एकत्रितपणे गटांनी शेती करण्यास प्रारंभ केला.
अनोरे येथे जय सावता गट असा शेतकऱ्यांनी गट स्थापन केला आहे. यात एकूण 13 शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आठ एकर क्षेत्रावर अळूच्या पानांची लागवड केली आहे.
अळूच्या शेतीला खर्च अत्यंत कमी येतो. एक तर याचे कंद हे सहज उपलब्ध होतात. एकदा पीक घेतले की लागवड केलेल्या कंदाच्या दुप्पट कंद जमिनीत तयार होतात. त्यातूनच पुढचे रोपण करावयाचे असते. या पिकाला कोणतेही किटकनाशक फवारणीची गरज पडत नाही. खत केवळ लागवडीच्या वेळी आणि तेही शेणखत. त्यामुळे उत्पादन खर्च अजिबात नाही. मशागतही केवळ पिकाच्या प्रारंभिक अवस्थेत आणि उत्पादन सतत. दर दोन ते तीन दिवसांत पानांची काढणी करावी लागते. पानाचा आकार हा अत्यंत मोठा असतो त्यामुळे काढणी करतांना ते फाटू नये याची काळजी घ्यावी लागते. या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला एकरी तीन लाख रुपये उत्पन्न आल्याचे, या शेतकऱ्यांनी सांगितले.
मधुकर देशमुख, नवल महाजन. सोमा भोई, दत्तू महाजन, दिलीप पाटील, सोमनाथ महाजन, संतोष चौधरी, भागवत चौधरी अशी या शेतकऱ्यांची नावे. प्रती एकरामागे वर्षाकाठी निव्वळ 1 लाख 60 हजार रुपये उत्पन्न त्यांना होते. या शेतकऱ्यांची मुख्य बाजारपेठ जवळची शहरे व शेजारच्या गुजराथ राज्यात. तेथील सुरत, बारडोली येथे अळूची वडी 'पात्रा भजी' नावाने खाल्ली जाते. तेथे हे शेतकरी आपला माल रेल्वेने पाठवतात.
या शेतीमुळे शेतकऱ्यांना चांगले आणि शाश्वत उत्पन्न मिळू लागल्याने त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारली आहे. या कमाईवर आता काही शेतकऱ्यांनी अन्यत्र आपले क्षेत्र वाढविले आहे. या पिकाला फक्त पाण्याची गरज अधिक असते. ती उपलब्धता पाहून हे शेतकरी जमीन भाडेतत्वावर घेऊन तेथे अळू लागवड करतात. त्यामुळे लागणारे भांडवल सर्व सभासद मिळून गोळा होते. त्यामुळे उत्पन्नही परवडते. हे उत्पन्न सतत येत असल्याने गरजांसाठी आता आम्ही स्वावलंबी झालो आहोत, असेही या शेतकऱ्यांनी सांगितले.
-मिलिंद मधुकर दुसाने
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

चित्रफीत पाहण्यासाठी खाली पहा...
अळूचे पान. एरवी या भाजीचे व्यावसायिक उत्पादन होऊ शकते, हे सहसा कोणाच्या ध्यानात येत नाही. परसात खोचलेले एक दोन कंद गरजेपूरती अळूची पाने उपलब्ध करुन देत असतात. पण लग्न समारंभात या अळूच्या पानांची वडी, अळवाची भाजी असा मेन्यू असतोच. मात्र नेमके याच वेळी ही पाने बाजारातही उपलब्ध नसतात. ही गरज हेरुन या शेतकऱ्यांनी अळूची लागवड व्यावसायिक स्तरावर केली. या सोबतच गवती चहा, पुदिना अशीही लागवड केली. प्रारंभी खाजगी आणि एकेकट्याने शेतकरी हे पीक घेत होते. नंतर मात्र त्यांनी एकत्रितपणे गटांनी शेती करण्यास प्रारंभ केला.
अनोरे येथे जय सावता गट असा शेतकऱ्यांनी गट स्थापन केला आहे. यात एकूण 13 शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आठ एकर क्षेत्रावर अळूच्या पानांची लागवड केली आहे.
अळूच्या शेतीला खर्च अत्यंत कमी येतो. एक तर याचे कंद हे सहज उपलब्ध होतात. एकदा पीक घेतले की लागवड केलेल्या कंदाच्या दुप्पट कंद जमिनीत तयार होतात. त्यातूनच पुढचे रोपण करावयाचे असते. या पिकाला कोणतेही किटकनाशक फवारणीची गरज पडत नाही. खत केवळ लागवडीच्या वेळी आणि तेही शेणखत. त्यामुळे उत्पादन खर्च अजिबात नाही. मशागतही केवळ पिकाच्या प्रारंभिक अवस्थेत आणि उत्पादन सतत. दर दोन ते तीन दिवसांत पानांची काढणी करावी लागते. पानाचा आकार हा अत्यंत मोठा असतो त्यामुळे काढणी करतांना ते फाटू नये याची काळजी घ्यावी लागते. या व्यवसायाच्या माध्यमातून वर्षाला एकरी तीन लाख रुपये उत्पन्न आल्याचे, या शेतकऱ्यांनी सांगितले.
मधुकर देशमुख, नवल महाजन. सोमा भोई, दत्तू महाजन, दिलीप पाटील, सोमनाथ महाजन, संतोष चौधरी, भागवत चौधरी अशी या शेतकऱ्यांची नावे. प्रती एकरामागे वर्षाकाठी निव्वळ 1 लाख 60 हजार रुपये उत्पन्न त्यांना होते. या शेतकऱ्यांची मुख्य बाजारपेठ जवळची शहरे व शेजारच्या गुजराथ राज्यात. तेथील सुरत, बारडोली येथे अळूची वडी 'पात्रा भजी' नावाने खाल्ली जाते. तेथे हे शेतकरी आपला माल रेल्वेने पाठवतात.
या शेतीमुळे शेतकऱ्यांना चांगले आणि शाश्वत उत्पन्न मिळू लागल्याने त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारली आहे. या कमाईवर आता काही शेतकऱ्यांनी अन्यत्र आपले क्षेत्र वाढविले आहे. या पिकाला फक्त पाण्याची गरज अधिक असते. ती उपलब्धता पाहून हे शेतकरी जमीन भाडेतत्वावर घेऊन तेथे अळू लागवड करतात. त्यामुळे लागणारे भांडवल सर्व सभासद मिळून गोळा होते. त्यामुळे उत्पन्नही परवडते. हे उत्पन्न सतत येत असल्याने गरजांसाठी आता आम्ही स्वावलंबी झालो आहोत, असेही या शेतकऱ्यांनी सांगितले.
-मिलिंद मधुकर दुसाने
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव
Aali che kande kuthun milata yetil sheti sathi
ReplyDeleteAali chy panache kande
Delete