बुधवार, ३० जुलै, २०१४

नंदुरबार जिल्हयामध्ये लोक प्रामुख्याने दऱ्याखोऱ्यात राहतात. पावसाचे प्रमाण मध्यम असून देखील उन्हाळयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या निर्माण होते. येथे पावसाळयापुरतीच शेती केली जाते. मात्र इतर वेळी रोजगाराचा प्रश्न लोकांसमोर उभा राहतो.
पावसाळ्यात पाणी वाहुन जाते. ज्या ठिकाणी नदी नाले आहेत त्या ठिकाणी सुध्दा इतर दिवसात पाणी नसते. त्यामुळे महिलांना 3 ते 4 कि.मी. अंतरावरुन पाणी आणावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांचे काबाडकष्ट वाढले आहेत. दिवसभर शेतीचे काम करुन पुन्हा पाणी लांबून आणणे यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते. तसेच गुरांना देखील पाणी प्यायला नसल्यामुळे बहुतेक लोक उन्हाळा आला की गुरे विकुन टाकतात. शासनाने येथे बऱ्याच योजना राबविल्या असून स्वयंरोजगारासाठी बचत गटांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.
शासनाच्या योजना आणि बँकेच्या सहकार्याने पाण्याच्या अडचणीवर बचत गटांनी मात करुन आपल्या गावातील पाण्याच्या प्रश्न सोडविला आहे. बोरवण ता. धडगांव या गावातील बिजलाराणी बचत गटातील महिलांनी पाण्याचे नियोजन करुन गावाचा व रोजगाराचा प्रश्न सोडविला आहे.
बचत गटातील महिलांनी पाणी व्यवस्थापन व रोजगार चे महत्व पटवुन देवून बँकेकडून कर्ज घेतले. कर्जातुन त्यांनी सर्वाना सोयीचे होईल अशा ठिकाणी बोअरवेल खोदली. तसेच बोअरवेल मधील पाणी एका ठिकाणी संकलीत करुन शेतामध्ये सोडले व त्यामध्ये भाजीपाला लावुन गावातच रोजगार निर्माण करुन दिला. याकामी गावकऱ्यांनी देखील चांगले सहकार्य केले. बचतगटाने शेती व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न सोडवून महिलांचे काबाडकष्ट कमी करुन, महिलांनी ठरविले तर काहीही होऊ शकते, हे दाखवून दिले आहे.
- जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार

नंदुरबार जिल्हयामध्ये लोक प्रामुख्याने दऱ्याखोऱ्यात राहतात. पावसाचे प्रमाण मध्यम असून देखील उन्हाळयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची समस्या निर्माण होते. येथे पावसाळयापुरतीच शेती केली जाते. मात्र इतर वेळी रोजगाराचा प्रश्न लोकांसमोर उभा राहतो.
पावसाळ्यात पाणी वाहुन जाते. ज्या ठिकाणी नदी नाले आहेत त्या ठिकाणी सुध्दा इतर दिवसात पाणी नसते. त्यामुळे महिलांना 3 ते 4 कि.मी. अंतरावरुन पाणी आणावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांचे काबाडकष्ट वाढले आहेत. दिवसभर शेतीचे काम करुन पुन्हा पाणी लांबून आणणे यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागते. तसेच गुरांना देखील पाणी प्यायला नसल्यामुळे बहुतेक लोक उन्हाळा आला की गुरे विकुन टाकतात. शासनाने येथे बऱ्याच योजना राबविल्या असून स्वयंरोजगारासाठी बचत गटांनाही प्रोत्साहन दिले जात आहे.
शासनाच्या योजना आणि बँकेच्या सहकार्याने पाण्याच्या अडचणीवर बचत गटांनी मात करुन आपल्या गावातील पाण्याच्या प्रश्न सोडविला आहे. बोरवण ता. धडगांव या गावातील बिजलाराणी बचत गटातील महिलांनी पाण्याचे नियोजन करुन गावाचा व रोजगाराचा प्रश्न सोडविला आहे.
बचत गटातील महिलांनी पाणी व्यवस्थापन व रोजगार चे महत्व पटवुन देवून बँकेकडून कर्ज घेतले. कर्जातुन त्यांनी सर्वाना सोयीचे होईल अशा ठिकाणी बोअरवेल खोदली. तसेच बोअरवेल मधील पाणी एका ठिकाणी संकलीत करुन शेतामध्ये सोडले व त्यामध्ये भाजीपाला लावुन गावातच रोजगार निर्माण करुन दिला. याकामी गावकऱ्यांनी देखील चांगले सहकार्य केले. बचतगटाने शेती व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न सोडवून महिलांचे काबाडकष्ट कमी करुन, महिलांनी ठरविले तर काहीही होऊ शकते, हे दाखवून दिले आहे.
- जिल्हा माहिती कार्यालय, नंदुरबार
No comments:
Post a Comment