शुक्रवार, ११ जुलै, २०१४

गाव विकासाच्या कामात स्पर्धा लावून चांगलं काम करणाऱ्या गावांना आणि प्रशासनाला प्रोत्साहनात्मक अनुदान द्यायचे, त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांच्या पाठीवर शाब्बासकी देऊन त्यांना प्रोत्साहित करायचे हा ग्रामविकास मंत्री जयंत पाटलांच्या कार्यकौशल्याचा अनोखा फंडा... त्यामुळेच हजारो गावं आज विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाली.
यशवंत पंचायतराज अभियानात विविध निकषांवर काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची 100 गुणांवर पडताळणी केली जाते आणि प्राप्त गुणांनुसार त्यांना अ+,अ, ब, क, ड अशा श्रेणी दिल्या जातात. भाग्यनगर ग्रामपंचायत अशी ग्रामपंचायत आहे जिने चांगलं काम तर केलंच पण आपली 'अ+' श्रेणी मिळवण्यातलं सातत्यही जपलं.
मित्रांनो एक तर कोणाला स्पर्धाच नको असते... आणि स्पर्धेत भाग घेणं जर बंधनकारक नसेल तर सोन्याहून पिवळं असं माननारेही खूप आहेत. पण सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील भाग्यनगर असं गाव आहे ज्या गावानं यशवंत पंचायतराज अभियानात सहभाग घेतला आणि 2010-11 पासून 2012-13 पर्यंत सलग तीन वर्षे विकासकामात सातत्य ठेवत 'अ+' श्रेणी मिळवली... अ+ श्रेणी म्हणजे 100 पैकी 91 ते 100 गुणांच्या दरम्यान गुण. भाग्यनगर ने मिळवले 100 पैकी 94 गुण.
द्रोणागिरी ओढ्याच्या काठाला वसलेलं हे गाव. गावाच्या वर एक तलाव. दोन ओढ्यांचा त्यात संगम म्हणून गावाला संगमेश्वर असंही म्हणतात. गाव बागायती शेती करणारं. गावची लोकसंख्या 1735. गावात एक गाव एक गणपतीसारखा अनोखा उपक्रम अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. गावात दारूबंदी आहे. गावानं लोकवर्गणीतून 25 लाख रुपये खर्चाचं श्रीनाथ मंदिर, मारुती मंदिर आणि गावच्या प्राथमिक शाळेचं बांधकाम केलं आहे.
गावानं 2007 मध्ये निर्मलग्राम पुरस्कार मिळवला. संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम अभियानात गावानं सातत्याने तीन वर्षे पुरस्कार मिळवत स्वच्छतेतील आपली आघडी कायम ठेवली. गावातील सौरपथदिव्यांमुळे वीज बचतीबरोबरच गावकऱ्यांची भारनियमनातून सुटका झालेली. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला इको व्हिलेज अंतर्गत लावलेलं झाडं 'दत्तक' देण्यात आलं आहे. ग्रामपंचायतीनं गावात स्मशानभूमीच्या आसपास वृक्षारोपण केलं आहे. गावची स्मशानभूमी आदर्श स्मशानभूमी असून गावानं सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतीला 10 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांसाठी इ-टेंडरिंग होते. गावात पाणी शुद्धीकरणाच्या तीन टाक्या असून घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत गावातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. यासाठी गावात 'घंटा गाडी' कार्यरत आहे. गावची गटारं स्वच्छ आणि मोकळी आहेत. तर इको व्हिलेज अंतर्गत गावानं एक व्यक्ती एक झाडं याप्रमाणे वृक्षलावगड केली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम म्हणून गावानं पुरस्कार मिळवला आहे. सर्वधर्मसमभाव हे गावाचे वैशिष्ट्य असून ग्रामपंचायतीने आपल्या 15 टक्के लोककल्याण निधीतून गावात एक उत्तम समाज मंदिर बांधले आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत असून गावकऱ्यांना सर्व प्रकारचे दाखले आणि उतारे हे संगणकाद्वारेच दिले जातात.
गावाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील पाणी स्त्रोत प्रदूषित होणार नाही याची गावानं विशेष काळजी घेतली आहे. तेराव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायतीने गावात आदर्श 'धोबी घाट' बांधला असून गावातील सर्व महिला तिथेच कपडे धुतात. गावाला सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनामध्ये पुरस्कार मिळाला आहे. इको व्हिलेजमधील तीन ही वर्षाचे निकष ग्रामपंचायतीने यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. ग्रामपंचायतीला 'पर्यावरण विकासरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीची सर्व प्रकारची कर वसुली मागील पाच वर्षांपासून 100 टक्के आहे. गावानं दलित वस्ती विकास व सुधारणा पुरस्कार देखील मिळवला आहे.
-डॉ.सुरेखा म. मुळे

गाव विकासाच्या कामात स्पर्धा लावून चांगलं काम करणाऱ्या गावांना आणि प्रशासनाला प्रोत्साहनात्मक अनुदान द्यायचे, त्यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांच्या पाठीवर शाब्बासकी देऊन त्यांना प्रोत्साहित करायचे हा ग्रामविकास मंत्री जयंत पाटलांच्या कार्यकौशल्याचा अनोखा फंडा... त्यामुळेच हजारो गावं आज विकासाच्या मार्गावर अग्रेसर झाली.
यशवंत पंचायतराज अभियानात विविध निकषांवर काम करणाऱ्या ग्रामपंचायतींची 100 गुणांवर पडताळणी केली जाते आणि प्राप्त गुणांनुसार त्यांना अ+,अ, ब, क, ड अशा श्रेणी दिल्या जातात. भाग्यनगर ग्रामपंचायत अशी ग्रामपंचायत आहे जिने चांगलं काम तर केलंच पण आपली 'अ+' श्रेणी मिळवण्यातलं सातत्यही जपलं.
मित्रांनो एक तर कोणाला स्पर्धाच नको असते... आणि स्पर्धेत भाग घेणं जर बंधनकारक नसेल तर सोन्याहून पिवळं असं माननारेही खूप आहेत. पण सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील भाग्यनगर असं गाव आहे ज्या गावानं यशवंत पंचायतराज अभियानात सहभाग घेतला आणि 2010-11 पासून 2012-13 पर्यंत सलग तीन वर्षे विकासकामात सातत्य ठेवत 'अ+' श्रेणी मिळवली... अ+ श्रेणी म्हणजे 100 पैकी 91 ते 100 गुणांच्या दरम्यान गुण. भाग्यनगर ने मिळवले 100 पैकी 94 गुण.
द्रोणागिरी ओढ्याच्या काठाला वसलेलं हे गाव. गावाच्या वर एक तलाव. दोन ओढ्यांचा त्यात संगम म्हणून गावाला संगमेश्वर असंही म्हणतात. गाव बागायती शेती करणारं. गावची लोकसंख्या 1735. गावात एक गाव एक गणपतीसारखा अनोखा उपक्रम अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. गावात दारूबंदी आहे. गावानं लोकवर्गणीतून 25 लाख रुपये खर्चाचं श्रीनाथ मंदिर, मारुती मंदिर आणि गावच्या प्राथमिक शाळेचं बांधकाम केलं आहे.
गावानं 2007 मध्ये निर्मलग्राम पुरस्कार मिळवला. संत गाडगेबाबा स्वच्छ ग्राम अभियानात गावानं सातत्याने तीन वर्षे पुरस्कार मिळवत स्वच्छतेतील आपली आघडी कायम ठेवली. गावातील सौरपथदिव्यांमुळे वीज बचतीबरोबरच गावकऱ्यांची भारनियमनातून सुटका झालेली. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला इको व्हिलेज अंतर्गत लावलेलं झाडं 'दत्तक' देण्यात आलं आहे. ग्रामपंचायतीनं गावात स्मशानभूमीच्या आसपास वृक्षारोपण केलं आहे. गावची स्मशानभूमी आदर्श स्मशानभूमी असून गावानं सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायतीला 10 लाख रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे.
ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांसाठी इ-टेंडरिंग होते. गावात पाणी शुद्धीकरणाच्या तीन टाक्या असून घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत गावातील ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा केला जातो. यासाठी गावात 'घंटा गाडी' कार्यरत आहे. गावची गटारं स्वच्छ आणि मोकळी आहेत. तर इको व्हिलेज अंतर्गत गावानं एक व्यक्ती एक झाडं याप्रमाणे वृक्षलावगड केली आहे. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम म्हणून गावानं पुरस्कार मिळवला आहे. सर्वधर्मसमभाव हे गावाचे वैशिष्ट्य असून ग्रामपंचायतीने आपल्या 15 टक्के लोककल्याण निधीतून गावात एक उत्तम समाज मंदिर बांधले आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज संगणकीकृत असून गावकऱ्यांना सर्व प्रकारचे दाखले आणि उतारे हे संगणकाद्वारेच दिले जातात.
गावाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गावातील पाणी स्त्रोत प्रदूषित होणार नाही याची गावानं विशेष काळजी घेतली आहे. तेराव्या वित्त आयोगाकडून मिळालेल्या निधीतून ग्रामपंचायतीने गावात आदर्श 'धोबी घाट' बांधला असून गावातील सर्व महिला तिथेच कपडे धुतात. गावाला सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनामध्ये पुरस्कार मिळाला आहे. इको व्हिलेजमधील तीन ही वर्षाचे निकष ग्रामपंचायतीने यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. ग्रामपंचायतीला 'पर्यावरण विकासरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीची सर्व प्रकारची कर वसुली मागील पाच वर्षांपासून 100 टक्के आहे. गावानं दलित वस्ती विकास व सुधारणा पुरस्कार देखील मिळवला आहे.
-डॉ.सुरेखा म. मुळे
No comments:
Post a Comment