शुक्रवार, ०१ ऑगस्ट, २०१४

राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2013 पासून अतिशय महत्वाकांक्षी अशी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली. जिल्ह्यात केवळ 7 महिन्यात 827 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी शासनाने 2 कोटी 44 लाख 78 हजार 820 रुपये खर्च केले आहेत.
मोठ्या व दुर्धर आजारासाठी गरीबांना आणि सामांन्याना चांगले उपचार करणे दुरापास्त होते. अनेक कुटुंबांना अशा आजारामुळे उपचाराचा खर्च भागविण्यासाठी कर्जबाजारी सुद्धा व्हावे लागते. ही बाब लक्षात घेऊन गरीबांना योग्य व चांगले उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केली. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत असून 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना या योजनाचा लाभ घेता येतो. ही योजना जनतेसाठी किती फायदेशीर ठरत आहे, याचा प्रत्यय जिल्ह्यातील आकडेवारी वरुन लक्षात येतो.
1 लाख उत्पन्न गट असणाऱ्या 2 लाख 34 हजार 810 कुटुंबांपैकी जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 92 हजार 750 कुटुंबाना आरोग्य कार्ड वितरीत करण्यात आले आहेत. आतापर्यंत 2 हजार 230 कुटुंबांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 843 कुटुंबातील 5 हजार 115 सदस्यांचे अर्ज मान्य करण्यात आले आहेत. एकूण लाभ घेतलेल्या 827 लाभार्थांपैकी सर्वात जास्त लाभार्थी हे केशरी रेशन कार्ड धारक आहेत. 405 केशरी रेशनकार्ड धारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून 389 पिवळे रेशनकार्ड आणि 33 अंत्योदय योजनेच्या कार्ड धारकांनी लाभ घेतला आहे.
827 लाभार्थ्यांचे तालुकानिहाय विवरण असे आहे. भंडारा-222 रुग्ण- 62 लाख 81 हजार 50 रुपये, लाखनी-106 रुग्ण-28 लाख 35 हजार 500 रुपये, मोहाडी- 115 रुग्ण-38 लाख 5 हजार आठशे पन्नास रुपये, पवनी-118 रुग्ण-36 लाख 9 हजार 400 रुपये, साकोली-94 रुग्ण-30 लाख 74 हजार 820 रुपये, तुमसर-113 रुग्ण-33 लाख 53 हजार 500 रुपये तर लाखांदूर-59 रुग्ण -15 लाख 18 हजार 700 रुपये असे एकूण 2 कोटी 44 लाख 78 हजार 820 रुपये शासनाकडून संबंधित रुग्णांलयाना अदा करण्यात आले आहे. 827 रुग्णांनी एकूण 1 हजार 79 आजारांसाठी उपचार करुन घेतले.
जिल्ह्यातील रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, लक्ष हॉस्पिटल, नाकाडे नर्सिंग होम, रंगारी नर्सिंग होम या चार रुग्णालयांमध्ये 515 आजारांसाठी उपचार घेतले. तर उर्वरित 564 आजारांसाठी जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेतले आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त रुग्णालयांच्या यादीमधील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येत असल्यामुळे मोठ्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी ही योजना खरोखरच जीवनदायी ठरत आहे.
-मनीषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा

राज्य शासनाने 21 नोव्हेंबर 2013 पासून अतिशय महत्वाकांक्षी अशी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली. जिल्ह्यात केवळ 7 महिन्यात 827 रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यासाठी शासनाने 2 कोटी 44 लाख 78 हजार 820 रुपये खर्च केले आहेत.
मोठ्या व दुर्धर आजारासाठी गरीबांना आणि सामांन्याना चांगले उपचार करणे दुरापास्त होते. अनेक कुटुंबांना अशा आजारामुळे उपचाराचा खर्च भागविण्यासाठी कर्जबाजारी सुद्धा व्हावे लागते. ही बाब लक्षात घेऊन गरीबांना योग्य व चांगले उपचार मिळण्यासाठी राज्य शासनाने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केली. सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत असून 1 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना या योजनाचा लाभ घेता येतो. ही योजना जनतेसाठी किती फायदेशीर ठरत आहे, याचा प्रत्यय जिल्ह्यातील आकडेवारी वरुन लक्षात येतो.
1 लाख उत्पन्न गट असणाऱ्या 2 लाख 34 हजार 810 कुटुंबांपैकी जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 92 हजार 750 कुटुंबाना आरोग्य कार्ड वितरीत करण्यात आले आहेत. आतापर्यंत 2 हजार 230 कुटुंबांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 843 कुटुंबातील 5 हजार 115 सदस्यांचे अर्ज मान्य करण्यात आले आहेत. एकूण लाभ घेतलेल्या 827 लाभार्थांपैकी सर्वात जास्त लाभार्थी हे केशरी रेशन कार्ड धारक आहेत. 405 केशरी रेशनकार्ड धारकांनी या योजनेचा लाभ घेतला असून 389 पिवळे रेशनकार्ड आणि 33 अंत्योदय योजनेच्या कार्ड धारकांनी लाभ घेतला आहे.
827 लाभार्थ्यांचे तालुकानिहाय विवरण असे आहे. भंडारा-222 रुग्ण- 62 लाख 81 हजार 50 रुपये, लाखनी-106 रुग्ण-28 लाख 35 हजार 500 रुपये, मोहाडी- 115 रुग्ण-38 लाख 5 हजार आठशे पन्नास रुपये, पवनी-118 रुग्ण-36 लाख 9 हजार 400 रुपये, साकोली-94 रुग्ण-30 लाख 74 हजार 820 रुपये, तुमसर-113 रुग्ण-33 लाख 53 हजार 500 रुपये तर लाखांदूर-59 रुग्ण -15 लाख 18 हजार 700 रुपये असे एकूण 2 कोटी 44 लाख 78 हजार 820 रुपये शासनाकडून संबंधित रुग्णांलयाना अदा करण्यात आले आहे. 827 रुग्णांनी एकूण 1 हजार 79 आजारांसाठी उपचार करुन घेतले.
जिल्ह्यातील रुग्णांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, लक्ष हॉस्पिटल, नाकाडे नर्सिंग होम, रंगारी नर्सिंग होम या चार रुग्णालयांमध्ये 515 आजारांसाठी उपचार घेतले. तर उर्वरित 564 आजारांसाठी जिल्ह्याबाहेरील रुग्णालयात उपचार घेतले आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील मान्यता प्राप्त रुग्णालयांच्या यादीमधील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येत असल्यामुळे मोठ्या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी ही योजना खरोखरच जीवनदायी ठरत आहे.
-मनीषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा
No comments:
Post a Comment