मंगळवार, ०६ मे, २०१४

ऐन उमेदीच्या काळातच ते गुन्हेगारीच्या चक्रव्युहात ओढले गेले. या वळणावरुन जातांना त्यांच्या नशिबी आली अंधारकोठडी अन काळवंडलेले आयुष्य. कैद्यांच्या जीवनाचा हा संघर्ष कारागृह प्रशासनाने त्यांच्यात सुविचारांची पेरणी करुन सकारात्मकतेत बदलविला. जे हात इतरांपुढे पसरले जात होते, मारण्यासाठी उगारले जात होते, तेच हात आज निर्मितीमध्ये राबू लागले आहे. जिल्हा कारागृहातील या कैद्यांच्या हातांनीच आता अंधारकोठडीपुढे सेंद्रिय शेती करीत अपराधी आयुष्यात सुखाची हिरवळ उभी केली आहे.
आयुष्यात झालेल्या एका अपराधामुळे नावापुढे लागलेला कैदी हा शिक्का अन् चार भिंतीत दिवस कंठण्याचे वाट्याला आलेले जीणे, परंतु ज्या हातांनी गुन्हा केला तेच हात राबले तर काय चमत्कार होऊ शकतो याची अनुभूती जिल्हा कारागृहातील शेती बघितल्यावर आल्याशिवाय राहत नाही. कैद्यांनी शेती फुलवून घामांचे मोती करण्याची किमया साध्य करुन दाखविली आहे.
गुन्हा कोणताही असो, कायदा कुणालाही माफ करीत नाही. गुन्ह्यासाठी शिक्षा ही अटळ असते. जाणते अजाणतेपणात अथवा रागाच्या भरात व्यक्ती कायद्याचे उल्लंघन करतो व ओघाने त्यांची रवानगी कारागृहात होते. कारागृहाच्या भिंतीपलीकडील विश्वाची, तेथील बंदीजनांबाबतची एक नकळत सीमारेषा आपण आखून घेतलेली असते. मात्र अशा चार भिंतीच्या विश्वातील बंदीजनांची सुधारणा आणि पुनर्वसनाची जबाबदारी कारागृह विभाग पार पाडते.
समाजात पुन्हा जातांना कैद्यांना एक नवी उमेद, नवी आशा घेऊन नव्या पर्वाची, नव्या आयुष्याची सकारात्मक सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. यवतमाळ जिल्हा कारागृहात 224 पुरुष व 5 महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मारामाऱ्यांपासून ते खून, दरोडे अशा गुन्हांचे कैदी शिक्षा झाल्यावर कारागृहात दाखल होते. कारागृहाला लागून व बसस्थानकाजवळ कारागृहाची 3 हेक्टर 24 आर शेती आहे. कैद्यांना स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी त्यांच्याकडून या शेतातील कामे करुन घेतली जातात. एक वर्षाच्या आत शिक्षा असलेल्या कैद्यांना शेती कामासाठी कारागृहाबाहेर काढले जाते. शेती कामासाठी आवश्यक असलेली साधने उपलब्ध करुन दिली जातात.
यवतमाळ कारागृहातील अशा कैद्यांनी गेल्या पावसाळ्यात भेंडीचे 18 क्विंटल तर दोडक्याचे 10 क्विंटल उत्पादन घेतले. रब्बी हंगामात अडीच क्विंटल पत्ताकोबी, 8 क्विंटल फुलकोबी, 6 क्विंटल टमाटर, 5 क्विंटल पालक, 2 क्विंटल सांबार, 3 क्विंटल मुळा आदी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. सध्या गहू व कांद्याची लागवड केली आहे. या शेतात राबतांना कैद्यी अगदी घरच्या शेतीसारखे राबत असल्याचे जाणवते. खुरपणी पासून ते फवारणी पर्यंतच्या कामात कैद्यांनी जीव ओतल्याचे जाणवते. विविध गुन्ह्यात अटक झालेल्या कैद्यांना रोज लागणारा भाजीपाला ते स्वत: पिकवतात. यवतमाळ कारागृहातील ही शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते हे विशेष...
- जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ

ऐन उमेदीच्या काळातच ते गुन्हेगारीच्या चक्रव्युहात ओढले गेले. या वळणावरुन जातांना त्यांच्या नशिबी आली अंधारकोठडी अन काळवंडलेले आयुष्य. कैद्यांच्या जीवनाचा हा संघर्ष कारागृह प्रशासनाने त्यांच्यात सुविचारांची पेरणी करुन सकारात्मकतेत बदलविला. जे हात इतरांपुढे पसरले जात होते, मारण्यासाठी उगारले जात होते, तेच हात आज निर्मितीमध्ये राबू लागले आहे. जिल्हा कारागृहातील या कैद्यांच्या हातांनीच आता अंधारकोठडीपुढे सेंद्रिय शेती करीत अपराधी आयुष्यात सुखाची हिरवळ उभी केली आहे.
आयुष्यात झालेल्या एका अपराधामुळे नावापुढे लागलेला कैदी हा शिक्का अन् चार भिंतीत दिवस कंठण्याचे वाट्याला आलेले जीणे, परंतु ज्या हातांनी गुन्हा केला तेच हात राबले तर काय चमत्कार होऊ शकतो याची अनुभूती जिल्हा कारागृहातील शेती बघितल्यावर आल्याशिवाय राहत नाही. कैद्यांनी शेती फुलवून घामांचे मोती करण्याची किमया साध्य करुन दाखविली आहे.
गुन्हा कोणताही असो, कायदा कुणालाही माफ करीत नाही. गुन्ह्यासाठी शिक्षा ही अटळ असते. जाणते अजाणतेपणात अथवा रागाच्या भरात व्यक्ती कायद्याचे उल्लंघन करतो व ओघाने त्यांची रवानगी कारागृहात होते. कारागृहाच्या भिंतीपलीकडील विश्वाची, तेथील बंदीजनांबाबतची एक नकळत सीमारेषा आपण आखून घेतलेली असते. मात्र अशा चार भिंतीच्या विश्वातील बंदीजनांची सुधारणा आणि पुनर्वसनाची जबाबदारी कारागृह विभाग पार पाडते.
समाजात पुन्हा जातांना कैद्यांना एक नवी उमेद, नवी आशा घेऊन नव्या पर्वाची, नव्या आयुष्याची सकारात्मक सुरुवात व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. यवतमाळ जिल्हा कारागृहात 224 पुरुष व 5 महिला कैदी ठेवण्याची क्षमता आहे. मारामाऱ्यांपासून ते खून, दरोडे अशा गुन्हांचे कैदी शिक्षा झाल्यावर कारागृहात दाखल होते. कारागृहाला लागून व बसस्थानकाजवळ कारागृहाची 3 हेक्टर 24 आर शेती आहे. कैद्यांना स्वावलंबनाचे धडे देण्यासाठी त्यांच्याकडून या शेतातील कामे करुन घेतली जातात. एक वर्षाच्या आत शिक्षा असलेल्या कैद्यांना शेती कामासाठी कारागृहाबाहेर काढले जाते. शेती कामासाठी आवश्यक असलेली साधने उपलब्ध करुन दिली जातात.
यवतमाळ कारागृहातील अशा कैद्यांनी गेल्या पावसाळ्यात भेंडीचे 18 क्विंटल तर दोडक्याचे 10 क्विंटल उत्पादन घेतले. रब्बी हंगामात अडीच क्विंटल पत्ताकोबी, 8 क्विंटल फुलकोबी, 6 क्विंटल टमाटर, 5 क्विंटल पालक, 2 क्विंटल सांबार, 3 क्विंटल मुळा आदी भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. सध्या गहू व कांद्याची लागवड केली आहे. या शेतात राबतांना कैद्यी अगदी घरच्या शेतीसारखे राबत असल्याचे जाणवते. खुरपणी पासून ते फवारणी पर्यंतच्या कामात कैद्यांनी जीव ओतल्याचे जाणवते. विविध गुन्ह्यात अटक झालेल्या कैद्यांना रोज लागणारा भाजीपाला ते स्वत: पिकवतात. यवतमाळ कारागृहातील ही शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते हे विशेष...
- जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ
No comments:
Post a Comment