गुरुवार, २२ मे, २०१४

बुलडाणा कृषीप्रधान देशातील खऱ्या अर्थाने कृषीवर अवलंबून असणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बुलडाणा जिल्हयात अवर्षणाचा मुकाबला करताना लोकचळवळीतून मोठया प्रमाणावर विकास कामे झाल्याने एकूणच विकासाला गती आली आहे.
जिल्हयात गेली सलग 2 वर्षे पाऊसमान कमी प्रमाणात होते. एका बाजूला विदर्भातील 10 जिल्हयात पाऊसमान अधिक आणि विदर्भाचे प्रवेशव्दार असणाऱ्या बुलडाण्यात मात्र महिन्यात एकदा पाणीपुरवठा अशी स्थिती निर्माण झाली होती. अशा बिकट स्थितीत या जिल्हयाचे जिल्हाधिकारी पद स्वीकारणाऱ्या किरण कुरुंदकर यांनी दुष्काळाला कायमस्वरुपी कसे संपवता येईल या भूमिकेत जलाशयांची क्षमता पुन्हा स्थापित करण्याचा निर्णय घेतला.
शेतातली माती सुपीक करण्यासाठी तलावातील गाळाचा उपयोग होवू शकतो व हे गौण खनिज सर्वांनी न्यावे ज्याचा दुहेरी फायदा होणार आहे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आणि मोठी लोकचळवळ उभी राहिले सलग 5 महिने जिल्हयात शेतकरी ट्रॅक्टर भरभरुन गाळ उपसून नेत आहेत असे चित्र दिसायला लागले.यासाठी शिस्तबध्द नियोजन करण्यात आलेले होत. याचे समन्वयन अतिरिक्त जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी आणि जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे होते. प्रथम टप्पयात सर्वेक्षण करण्यात आले. जेसीबी व पोकलेनच्या याद्या उपलब्ध करुन देण्यात आल्या. ग्रामसभा आणि प्रसिध्दीच्या माध्यमातून या कार्याला बळ देण्यात आले.
या पाच महिन्यात 290 प्रकल्पांमधून लोकसहभागातून 17480 शेतकऱ्यांनी 47 लाख 21 हजार 243 घनमीटर गाळ उचलला यामुळे इतकीच फेरभरण क्षमता निर्माण झाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रजासत्ताक दिनी भाषणात केलेल्या आवाहनानुसार ही आपत्ती इष्टापत्तीत रुपांतरीत झाली. याचे फळ लगेचच पावसाळयात झालेल्या भरपूर पावसात दिसले. आजही बुलडाणा जिल्हयात सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असून अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सुरुच आहे.
खरिपाचा हंगाम झाल्यावर 8 महिने काहीच काम नसणाऱ्या या जिल्हयात उपलब्ध पाण्यामुळे आता रबीच्या हंगामाचे नियोजन झाले आहे. शेतीला व शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगले दिवस येणार असं चित्र निर्माण झालय.
या कामाचे मोल आर्थिक रुपात लावयाचे झाले तर रोहयोच्या मजूरीच्या दरानुसार 40 हजार 732 मनुष्य दिवस कामाची निर्मिती झाली. तर गाळ पसरविण्यात 47,385 मनुष्यदिवस आणि यांत्रिकी दुरुस्ती व इतर कामात 450 दिवस मनुष्यदिनाची निर्मिती झाली. ही आर्थिक गणितात रुपांतरीत रक्कम 1 कोटी 43 लाख 47 हजार 854 इतकी होते.
सकारात्मक दृष्टीकोणातून समस्येचा मुकाबला केला तर किती भव्य काम होवू शकते याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, बुलडाणा

बुलडाणा कृषीप्रधान देशातील खऱ्या अर्थाने कृषीवर अवलंबून असणारा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बुलडाणा जिल्हयात अवर्षणाचा मुकाबला करताना लोकचळवळीतून मोठया प्रमाणावर विकास कामे झाल्याने एकूणच विकासाला गती आली आहे.
जिल्हयात गेली सलग 2 वर्षे पाऊसमान कमी प्रमाणात होते. एका बाजूला विदर्भातील 10 जिल्हयात पाऊसमान अधिक आणि विदर्भाचे प्रवेशव्दार असणाऱ्या बुलडाण्यात मात्र महिन्यात एकदा पाणीपुरवठा अशी स्थिती निर्माण झाली होती. अशा बिकट स्थितीत या जिल्हयाचे जिल्हाधिकारी पद स्वीकारणाऱ्या किरण कुरुंदकर यांनी दुष्काळाला कायमस्वरुपी कसे संपवता येईल या भूमिकेत जलाशयांची क्षमता पुन्हा स्थापित करण्याचा निर्णय घेतला.
शेतातली माती सुपीक करण्यासाठी तलावातील गाळाचा उपयोग होवू शकतो व हे गौण खनिज सर्वांनी न्यावे ज्याचा दुहेरी फायदा होणार आहे असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आणि मोठी लोकचळवळ उभी राहिले सलग 5 महिने जिल्हयात शेतकरी ट्रॅक्टर भरभरुन गाळ उपसून नेत आहेत असे चित्र दिसायला लागले.यासाठी शिस्तबध्द नियोजन करण्यात आलेले होत. याचे समन्वयन अतिरिक्त जिल्हाधिकारी चिंतामणी जोशी आणि जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे होते. प्रथम टप्पयात सर्वेक्षण करण्यात आले. जेसीबी व पोकलेनच्या याद्या उपलब्ध करुन देण्यात आल्या. ग्रामसभा आणि प्रसिध्दीच्या माध्यमातून या कार्याला बळ देण्यात आले.
या पाच महिन्यात 290 प्रकल्पांमधून लोकसहभागातून 17480 शेतकऱ्यांनी 47 लाख 21 हजार 243 घनमीटर गाळ उचलला यामुळे इतकीच फेरभरण क्षमता निर्माण झाली व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रजासत्ताक दिनी भाषणात केलेल्या आवाहनानुसार ही आपत्ती इष्टापत्तीत रुपांतरीत झाली. याचे फळ लगेचच पावसाळयात झालेल्या भरपूर पावसात दिसले. आजही बुलडाणा जिल्हयात सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असून अनेक प्रकल्पांमधून विसर्ग सुरुच आहे.
खरिपाचा हंगाम झाल्यावर 8 महिने काहीच काम नसणाऱ्या या जिल्हयात उपलब्ध पाण्यामुळे आता रबीच्या हंगामाचे नियोजन झाले आहे. शेतीला व शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगले दिवस येणार असं चित्र निर्माण झालय.
या कामाचे मोल आर्थिक रुपात लावयाचे झाले तर रोहयोच्या मजूरीच्या दरानुसार 40 हजार 732 मनुष्य दिवस कामाची निर्मिती झाली. तर गाळ पसरविण्यात 47,385 मनुष्यदिवस आणि यांत्रिकी दुरुस्ती व इतर कामात 450 दिवस मनुष्यदिनाची निर्मिती झाली. ही आर्थिक गणितात रुपांतरीत रक्कम 1 कोटी 43 लाख 47 हजार 854 इतकी होते.
सकारात्मक दृष्टीकोणातून समस्येचा मुकाबला केला तर किती भव्य काम होवू शकते याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल.
प्रशांत दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, बुलडाणा
No comments:
Post a Comment